Tuesday, 10 September 2013

अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेला नविन लेटेस्ट अग्निपथ...

अजय अतुलच संगीत,ह्रितिक रोशनचा लुक ,संजय दत्तच टक्कल व कानातील बाळी या तीन गोष्टीमुळे मला अग्निपथच आकर्षण आहे.
 इथे फक्त अग्निपथ च्या संगीताबद्दल लिहिणार आहे.मला संगीतातला एकही राग काळत नाही,जे कानाला चांगल वाटत ते मी ऐकतो त्यामुळे खाली मी जे काही लिहिलय ते माझ वयक्तिक मत आहे इतर कुणीही राग मानण्याच कारण नही अन मानाला तरी माझी हरकत नाही.असो सुरवात चिकनी चमेली पासून मुन्नी,शिला,जलेबी बाई अन आता चिकनी चमेली ह्या लई भारी आयटम आहेत.खारूक मला आवडत नही त्यामुळे त्याच्या छम्मक छल्लोचा इथे उल्लेख नाही, असो विषय तो नाही.
 जी मजा गावरान कोंबडी ला असते ती मजा बॉयलर चिकनला नही हे खाण्यासोबत इथेही लागू होत.श्रेया घोषाल ही १०१% उत्कृष्ट गायिका आहे यात वाद नही.पण कोल्हापुरी झणझणीत गावरान चिकन सोबत जर तुम्हाला कुणी देशपांड्यांच्या घरची साजूक तूप लावलेली पुरणाची पोळी दिली तर तुम्हाला काय वाटेल तस्सच मला हे गाण पहिल्यांदा ऐकल्यावर वाटल होत.
 साजूक तूप लावलेली पुरणपोळी व झणझणीत गावरान चिकन या ऐकत्र खायच्या गोष्टी नव्हेत त्या स्वतंत्र खाल्ल्या तरच तृप्ती होते.या गाण्यात हाच घोळ झालाय.
 एवढा जबरदस्त महाराष्ट्रीयन ओर्केष्ट्रा असताना त्यात विनाकारण बंगाली रसगुल्ला मिक्स केला आहे त्यामुळे चांगल्या गाण्याच वाट्टोळ झाल आहे.विश्वास बसत नसेल तर "जानलेवा जलवा है देखणे मे हलवा है" हे श्रेया च्या तोंडून ऐका.हे गाण ऐकल्यावर येथे पाहिजे जातीचे ह्या संत वचनाचा प्रत्येय येतो.
 थोडक्यात सांगायचं म्हणजे हे गाण चांगल झाल असत जर इथे श्रेया च्या जागी सुनिधी चोहान असती तर.खर तर हे गण ऐकण्यापेक्षा यावर गणपती मिरवणुकीत नाचायचं असत.असो.

ओ सय्या
 या चित्रपटातील नितात सुंदर गाण म्हणजे ओ सय्या हे होय .हे गाण पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच खूप आवडल.रूपकुमार राठोड यांचा आवाज ,गाण्याला असणारा सुफी टच,आणि अजय अतुल याचं कम्पोझिशन हे सगळ उत्तम जुळून आलय .अजय अतुल हे कुठल्याही लाउड वाद्याशिवाय चांगल गाण देऊ शकतात हे त्यांनी आधीच जोगवातील जीव रंगला या गाण्यातून दाखवून दिल आहेच.ते त्यांनी इथे पुन्हा सिद्ध केलं

गुन गुना रे

अजून एक माझ आवडत गाण.एकदम foot tapping song.या ठिकाणी अजय अतुल यांनी एकदम योग्य निर्णय घेऊन सुनिधी चोहान ला गायिका म्हणून घेतलं अन ते योग्य आहे हे तिने ते पहिल्याच कडव्यात प्रूव्ह करून दाखवलं.ढोल ताशा ,महाराष्ट्रीयन लोकसंगीत हा अजय अतुल चा प्लस पोईंट.याच गाण्यात त्यांनी "गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजेची लाली " या त्यांच्या जुन्या मराठी गीतात वापरलेल एक वाद्य पुन्हा इथे चांगल वापरलं आहे.हे गाण आवडण्याच अजून कारण म्हणजे शेवटी शेवटी का होईना उदित नारायण यांचा आवाज.सुनिधी चोहान हिचा जादुई मोहक आवाज ऐकल्यावर उदित नारायण याचं कडव म्हणजे जेवणानंतरच डेझर्ट आहे.कदाचित खाने के बाद कुछ मिठा हो जाये म्हणून उदित नारायण यांचा आवाज घ्यायचा मोह अजय अतुल यांना सुद्धा आवरला नसेल.

शाह का रुतबा
 ही कव्वाली बरी आहे पण का कुणास ठाऊक हे गाण पहिल्यांदा ऐकल व लगेच माझ्या सगळ्यात आवडत्या संगीतकाराच(रेहमानच) मांगल पांडे या चित्रपटातील अल मुदथ मौला हे गाण आठवल अन शाह का रुतबा ह्या गाण्यावरच माझा इंटरेस्ट संपला व मी पुन्हा अल मुदथ मौला हे ऐकू लागलो.शाह का रुतबा मधील सुखविंदर व आनंद राज आनंद यांचा आवाज उत्तम.

देवा श्री गणेशा
 हे गाण स्वत: अतुल ने गायलंय अन चांगल गायलंय.या पेक्षा आपल् मराठीतील मोरया हे गाण कैकपटीने आवडत मला.पण हे सुद्धा ठीक आहे.मोरया मध्ये ढोलचा पक्का पुणेरी फील होता अन या मध्ये मुंबईचा जाणवतो अन ते अतुल ने सुद्धा मान्य केल आहे अन जो कथेनुसार योग्य आहे अस वाटत .मोरया गाण्यातून ज्या भावना पोहोचतात त्य या गाण्यातून पोहचत नाही अस वाटत पण यात अजय अतुल चा नक्कीच काही दोष नसावा कारण कथेची मागणी .असो.

No comments:

Post a Comment